श्री विठ्ठल माहात्म्य
|| श्री पांडुरंग ||
पंढरीच्या सावळ्या परब्रह्मांची विविध काळात विविध नावांनी उपासना केली आहे. पंढरीनाथ, पांडुरंग, पंढरीराया, विठाई, विठोबा, विठुमाऊली, विठ्ठल गुरूराव, पांडुरंग, हरि, इ. नांवे भक्तांनी दिलेली आढळतात.आज सर्वपरिचित व प्रचलित नांव म्हणजे 'पांडुरंग'आणि 'श्रीविठ्ठल'. विठ्ठल शब्दाची उत्पत्ती कशी झाली याचा अनेक इतिहासकारांनी व संशोधकांनी अभ्यास केला आहे.बरेच लोक विठ्ठल हा शब्द विष्णु या शब्दाचा अपभ्रंश आहे असे म्हणतात. कानडी शिलालेखातही जे विठ्ठरस, विट्ट असे शब्द आले आहेत ते विष्णु शब्दाची व्याप्ती सांगणारेच आहेत असे मानले जाते.संत तुकोबारायांनी विठोबा शब्दाची उत्पत्ती आपल्या एका अभंगात अत्यंत सोप्या भाषेत केली आहे. तो असा की वि म्हणजे ज्ञान ठोबा म्हणजे आकार -ज्ञानाचा आकार किंवा ज्ञांनाची मूर्ती म्हणजे विठोबा किंवा वि म्हणजे गरूड अणि ठोबा म्हणजे आसन अर्थात गरूड ज्याचे आसन आहे तो विष्णू तोच कटीवर कर ठेवूनि विटेवरी उभा आहे. श्रीकृष्ण, श्रीविष्णु आणि श्रीविठोबा हे एकच आहेत. श्रीकृष्णाचा अवतार द्वापार युगाच्या शेवटी बुधवारी श्रावण वद्य अष्टमीला झाला. विठोबा म्हणजे श्रीकृष्ण म्हणून बुधवार हा विठ्ठलाचा वार मानला जातो. आजही वारकरी लोक बुधवारी पंढरपुरातून जात नाहीत.
पुराणातील श्लोकाप्रमाणे
वि कारो विधाताय, ठ कारो नीलकण्ठ |
ल कारो लक्ष्मीकांत, विठ्ठलाभिधिनीयमे ||
अर्थ-
वि- विधाता- ब्रम्हदेव
ठ्ठ- नीलकण्ठ- शंकर
ल- लक्ष्मीकांत- विष्णू
याप्रमाणे म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश हे एकाच ठिकाणी म्हणजेच विठ्ठल नावात आहेत.
पंढरीच्या सावळ्या परब्रह्मांची विविध काळात विविध नावांनी उपासना केली आहे. पंढरीनाथ, पांडुरंग, पंढरीराया, विठाई, विठोबा, विठुमाऊली, विठ्ठल गुरूराव, पांडुरंग, हरि, इ. नांवे भक्तांनी दिलेली आढळतात.आज सर्वपरिचित व प्रचलित नांव म्हणजे 'पांडुरंग'आणि 'श्रीविठ्ठल'. विठ्ठल शब्दाची उत्पत्ती कशी झाली याचा अनेक इतिहासकारांनी व संशोधकांनी अभ्यास केला आहे.बरेच लोक विठ्ठल हा शब्द विष्णु या शब्दाचा अपभ्रंश आहे असे म्हणतात. कानडी शिलालेखातही जे विठ्ठरस, विट्ट असे शब्द आले आहेत ते विष्णु शब्दाची व्याप्ती सांगणारेच आहेत असे मानले जाते.संत तुकोबारायांनी विठोबा शब्दाची उत्पत्ती आपल्या एका अभंगात अत्यंत सोप्या भाषेत केली आहे. तो असा की वि म्हणजे ज्ञान ठोबा म्हणजे आकार -ज्ञानाचा आकार किंवा ज्ञांनाची मूर्ती म्हणजे विठोबा किंवा वि म्हणजे गरूड अणि ठोबा म्हणजे आसन अर्थात गरूड ज्याचे आसन आहे तो विष्णू तोच कटीवर कर ठेवूनि विटेवरी उभा आहे. श्रीकृष्ण, श्रीविष्णु आणि श्रीविठोबा हे एकच आहेत. श्रीकृष्णाचा अवतार द्वापार युगाच्या शेवटी बुधवारी श्रावण वद्य अष्टमीला झाला. विठोबा म्हणजे श्रीकृष्ण म्हणून बुधवार हा विठ्ठलाचा वार मानला जातो. आजही वारकरी लोक बुधवारी पंढरपुरातून जात नाहीत.
पुराणातील श्लोकाप्रमाणे
वि कारो विधाताय, ठ कारो नीलकण्ठ |
ल कारो लक्ष्मीकांत, विठ्ठलाभिधिनीयमे ||
अर्थ-
वि- विधाता- ब्रम्हदेव
ठ्ठ- नीलकण्ठ- शंकर
ल- लक्ष्मीकांत- विष्णू
याप्रमाणे म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश हे एकाच ठिकाणी म्हणजेच विठ्ठल नावात आहेत.
|| श्रीविठ्ठल
मुर्तीवर्णन ||
दिनांचा दयाळू, भक्तकामकल्पप्रदुम आणि योगियादुर्लभ
असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे. श्रींच्या मस्तकी
मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे. याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास
शिवलिंग म्हणतात. श्रींचे मुख उभट आहे. गाल फुगीर आहेत. दृष्टी समचरण आहे. कानी
मकर कुंडले आहेत. गळ्यात कौस्तुभमणी आहे. पाठीवर शिंके असून ह्रदयस्थानी
श्रीवत्सलांछन आहे. दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबंध आहेत. नितंब कराभ्याम्
धृतो येन तस्मात् असे आद्यशंकराचार्यांनी श्रीविठ्ठल मूर्तीचे पांडुरंगाष्टक लिहून
सुंदर व मार्मिक वर्णन केलेले आहे. श्रीविठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले आहेत. उजव्या
हातात कमळाचा देठ असून हात उताणा, अंगठा खाली येईल असा टेकविला आहे, तर डाव्या हातात शंख आहे. श्रींचे
कमरेला तिहेरी मेखला आहे. छातीवर उजवीकडे भृगुऋषींनी पादस्पर्श केलेली खूण आहे.
ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे. कमरेला वस्त्र आहे. वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे.
डाव्या पायावर मृतकेषी नावाचे दासीने बोट लावलेची खूण आहे. अशी दगडी विटेवर उभी
असलेली मूर्ती आहे.
श्रींचे चरणस्पर्शदर्शन अथवा चरणी मस्तक ठेवून दर्शन
घेवून समाधान प्राप्त करण्याचे भाग्य केवळ इथेच आहे.
द्वापार युगात मुचकुंद नावाचा एक पराक्रमी राजा होवून
गेला. देव-दैत्यांच्या युद्धात देवांनी त्याचे सहाय्य मागितले. मुचकुंद राजाने
अतिशय पराक्रम गाजवून देवांना विजय मिळवून दिला. देवांनी प्रसन्न होवून वर मागण्यास
सांगितले तेव्हा मुचकुंद म्हणाला, अत्यंत श्रमामुळे मी थकलो, मला एकांती गाढ निद्रा हवी. जो
कोणी माझी निद्राभंग करील, तो माझ्या दृष्टीक्षेपाने भस्म होवून जावा. देवांनी
तथास्तु म्हटले. राजा एका गुहेत निद्राधीन झाला. पुढे कृष्ण अवतारात जरासंधाकडून
कालयौवन नावाचा अत्यंत बलाढ्य असा राक्षस कृष्णाकडे युद्धासाठी आला. हा राक्षस
शस्त्र किंवा अस्त्राने मरणार नसल्याने भगवान श्रीकृष्णाने युक्तीने त्या दैत्यास
ज्या गुहेत मुचकुंद राजा निद्राधीन झाला होता, त्या गुहेत नेले झोपलेल्या मुचकुंदावर
आपल्या अंगावरचा शेला टाकला व स्वत: श्रीकृष्ण अंधारात लपले. भगवान श्रीकृष्णाचा
शेला पाहून काळयौवनास वाटले की, कृष्णच झोपला आहे, म्हणून त्याने निद्रिस्त राजावर
लत्ताप्रहार केले.मुचकुंद राजाची निद्राभंग झाली.क्रोधीत नजरेने कालयौवनाकडे
पाहताच तो दैत्य कापराप्रमाणे जळून भस्म झाला. नंतर श्रीकृष्णाने राजाला दर्शन
दिले. भगवान श्रीकृष्णांनी सर्व प्रसंग राजाला सांगितला. तेव्हा मुचकुंद राजाने
आता दृष्टीपुढे ऐसाचि तू राहे अशी प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्णाने पुढील जन्मी
तुझी इच्छा पूर्ण करीन, असे अभिवचन दिले. हा मुचकुंद राजा कलियुगात भक्त
पुंडलिकाच्या रूपाने जन्माला आला. दिंडीर वनात (पंढरपूर क्षेत्राजवळ) चंद्रभागेतिरी
लोहदंड तीर्थाजवळ वास्तव्य करून राहिला.
श्रीकृष्णास असलेल्या मुख्य ८ भार्यांपैकी राधिकादेवीस
जवळ बसवून घेतल्याचे श्रीरूक्मिणी देवीने पाहिले असता सवतीमत्सरापोटी श्रीरूक्मिणी
रागाने निघून येवून दिंडिर वनात तपश्चर्या करीत बसली. त्यावेळी रूक्मिणीचे शोधार्थ
भगवान श्रीक्षेत्र पंढरपूरात आले असता रूक्मिणीचा शोध घेतला असता दिंडीर वनात
तपश्चर्या करीत असल्याचे दिसले म्हणून तपश्चर्या भंग करू नये व मुचकुंद राजास
पूर्वजन्मी दिलेल्या वरानुसार रूक्मिणीच्या शोधाचे निमित्त साधून तीर्थक्षेत्री
पुंडलिकासाठी आले.
पुंडलिक पूर्वाश्रमी माता-पित्याचा द्रोह करीत असे. पत्नीच्या
हट्टासाठी तो तिच्याबरोबर काशीयात्रेस निघाला. जाताना कुक्कुट मुनीच्या आश्रमात
राहिला. कुक्कुटमुनी परम मातृ-पितृ भक्त होते. माता-पित्याची निस्सीम सेवा केल्यामुळे
त्यांना अलौकिक सामर्थ्य प्राप्त झाले होते. पापी, दुराचारी अधमांनी स्नान केल्याने
दूषित मलीन झालेल्या गंगा, यमुना, सरस्वती या नद्या मालिन्यनाशासाठी व शुद्धतेसाठी
आश्रमात रोज सेवा करीत. त्यामुळे त्यांना पावित्र्य व शुद्धता प्राप्त होई. हा
प्रसंग पुंडलिकाने अनुभवला. नद्यांनी देवीरूपात त्यास उपदेश केला. त्याला ज्ञान
प्राप्त झाले.त्याने माता-पित्याची अखंड सेवेची दीक्षा घेतली.तो पुन्हा पंढरीस
आला. भक्तिभावाने माता-पित्याची सेवा करू लागला.
पुंडलिकाची मातृ-पितृ भक्ती व सेवाव्रत पाहून भगवंत संतुष्ट
झाले. ते पुंडलिकाचे भेटीसाठी लोहदंड तीर्थाजवळ आले. पुंडलिक माता-पित्याच्या
सेवेत मग्न होते. भगवंताने त्यास दर्शन दिले, वर दिला. पुंडलिकाने त्याचे
माता-पित्याची सेवा पूर्ण होईपर्यंत देवाला विटेवर उभे राहून प्रतिक्षा करण्याची
विनंती केली. भगवंतानी त्याची प्रार्थना मान्य केली. पुंडलिकांनी देवाला उभा
राहण्यासाठी वीट फेकली, ती वीट म्हणजे वृत्रासुराच्या शापाने दग्ध झालेला इंद्रच
होय. भीमातीर म्हणजे दुसरी द्वारका, भगवान श्रीकृष्ण विठ्ठल रूपात कटीवर हात ठेवून
भक्तासाठी युगे अठ्ठावीस अजूनही उभा आहे. संत शिरोमणी नामदेवराय आरतीत म्हणतात
|| पुंडलिकाभेटी परब्रह्म आले गा ||
|| पुंडलिकाभेटी परब्रह्म आले गा ||
||श्रीरुक्मिणी मंदिर||
श्रीरुक्मिणी मातेचे मंदिर श्रीविठ्ठल मंदिराच्या
उत्तर बाजूस आहे.या मंदिराचे सभामंडप, मुख्य मंडप, मध्यगृह, गाभारा असे चार भाग आहेत. मध्यगृहाच्या उत्तरेकडील
बाजुस एक खोली आहे. हे रुक्मिणीमातेचे शेजघर आहे. आत चांदीचा पलंग, गाद्या व मखमली बिछाना आहे.
गाभार्याच्या समोरच उंच चौथरा आहे. त्यावर अत्यंत रेखीव
रुक्मिणीमातेची पुर्वाभिमुख मूर्ती आहे. देवीचे हात विठ्ठलाप्रमाणे कटीवर आहेत.
देवीला सौभाग्यलंकार घालुन, वस्त्रे नेसवून सजवितात,ठसठशीत कुंकवाचा मळवट भरतात.
अत्यंत प्रसन्न मुद्रा असलेली श्रीरुक्मिणीमातेची मुद्रा पाहताच भाविक भक्त
भक्तीयुक्त अंतःकरणाने तिचे दर्शन घेतात.
रुक्मिणीमातेबद्दलची
आख्यायिका अशी आहे की -श्रीकृष्णास असलेल्या मुख्य ८ भार्यांपैकी राधिकादेवीस जवळ
बसवून घेतल्याचे श्रीरूक्मिणी देवीने पाहिले असता सवतीमत्सरापोटी श्रीरूक्मिणी रागाने
निघून येवून दिंडिर वनात तपश्चर्या करीत बसली. त्यावेळी रूक्मिणीचे शोधार्थ भगवान
श्रीक्षेत्र पंढरपूरात आले असता रूक्मिणीचा शोध घेतला असता दिंडीर वनात तपश्चर्या
करीत असल्याचे दिसले म्हणून तपश्चर्या भंग करू नये व मुचकुंद राजास पूर्वजन्मी
दिलेल्या वरानुसार रूक्मिणीच्या शोधाचे निमित्त साधून तीर्थक्षेत्री पुंडलिकासाठी
आले.
श्रीरूक्मिणी मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम
- पहाटे 4.00 वाजता नामदेव पायरी दरवाजा
उघडणे
- पहाटे 4.30 वाजता श्रीरूक्मिणीचा काकडा
- पहाटे 5.00 ते 6.00 नित्यपूजा
- सकाळी 6.00 भाविकांना दर्शन सुरू
- सकाळी 11 वाजता महानैवेद्य
- दुपारी 4.30 वाजता पोषाख
- सायं 6.45 धुपारती दिनमानाप्रमाणे
चातुर्मासात
रोज सकाळी ६ ते ८ श्रीमद भागवतावर प्रवचन चालते. सभामंडपात आतील पूर्व पश्चिम
कमानीवर आतील बाजूने, लोखंडी चौकटी
फ्रेममध्ये "रुक्मिणी-स्वयंवराची" सर्व कथा चित्ररूपाने लावली आहेत.इथे
एकुण आठ चित्रे आहेत आणि ती सर्व चित्रे अतिशय सुरेख आहेत.
दरवर्षी रुक्मिणी मातेच्या मंदिरात नवरात्र महोत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या उत्सव प्रसंगी घटस्थापनेपासून पोर्णिमेपर्यंत १५ दिवस दररोज रुक्मिणी मातेला तसेच पांडुरंगाला विविध वैशिष्टयपूर्ण पोषाख करण्यात येतात. प्रत्येक पोषाख बघण्यासाठी भाविकांची रुक्मिणी मातेच्या मंदिरात नेहमीपेक्षा जास्त गर्दी असते. नवरात्र महोत्सवात दररोज रात्री ९ ते ११ वा. पर्यंत संत तुकाराम भवन याठीकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय किर्तीच्या कलाकारांना आमंत्रित करण्यात येते. पंढरपूर शहरातील भाविक दरवर्षी या विशेष कार्यक्रमाची आतुरतेने प्रतिक्षा करीत असतात.तसेच मकरसंक्रांतीच्या दिवशीही या मंदिरात हळ्दीकुंकू कार्यक्रमास माताभगिनींची प्रचंड गर्दी असते.
दरवर्षी रुक्मिणी मातेच्या मंदिरात नवरात्र महोत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या उत्सव प्रसंगी घटस्थापनेपासून पोर्णिमेपर्यंत १५ दिवस दररोज रुक्मिणी मातेला तसेच पांडुरंगाला विविध वैशिष्टयपूर्ण पोषाख करण्यात येतात. प्रत्येक पोषाख बघण्यासाठी भाविकांची रुक्मिणी मातेच्या मंदिरात नेहमीपेक्षा जास्त गर्दी असते. नवरात्र महोत्सवात दररोज रात्री ९ ते ११ वा. पर्यंत संत तुकाराम भवन याठीकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय किर्तीच्या कलाकारांना आमंत्रित करण्यात येते. पंढरपूर शहरातील भाविक दरवर्षी या विशेष कार्यक्रमाची आतुरतेने प्रतिक्षा करीत असतात.तसेच मकरसंक्रांतीच्या दिवशीही या मंदिरात हळ्दीकुंकू कार्यक्रमास माताभगिनींची प्रचंड गर्दी असते.
Teacher is one who shapes up the whole life of the students through his knowledge, patience, love and care.
ReplyDeleteDinesh great work ,,.I proud of u..and our ..friendship best luck..
ReplyDelete